आजवरची वाटचाल
Welcome to Mali Bandhan
अपेक्षा कुठलीही व कोणतीही असो आपली आवड निवड व गरज लक्षात घेऊन नाते गुंफविणारे आपल्या हक्काचे व्यासपिठ म्हणजे जळगांव येथील परिचय मेळावा माळी- बंधन २०२३
लग्न म्हणजे भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र संस्कार. विवाह म्हणजे आपण सर्वांच्याच आयुष्यातील एक चिरस्मरणीय, व्यक्तिगत अन सामाजिक सोहळा. लग्न म्हणजे दोन जीवांच्या एकरूप संसाराची मुहूर्तमेढ. पण या एकविसाव्या शतकात प्रत्येक पुरुषाच्या आणि स्त्रीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत असे दिसते. त्या मुळे लग्न जमविताना फार विचार करावा लागतो. त्यात मुलगा किंवा मुलगी सुशिक्षित असल्यामुळे पालकही जागरूक होत आहेत. सर्वार्थाने सुखी संसार करायचा तर जोडीदाराची उत्तम साथ हवी, म्हणूनच सुयोग्य जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेत पालक आणि मुले दोघांचा समावेश आवश्यक आहे. पालकांचा अनुभव आणि मुलांच्या अपेक्षा याचा सुरेख ताळमेळ व्हावा आणि काळजी पूर्वक व सोप्या बहुविध पर्यायातून जोडीदार निवडता यावा ह्याच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आणि इच्छेतून हा समाज प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
News
टीप :
आम्ही फक्त वधु-वर सुचक आहोत. मध्यस्ती, पसंती व व्यवहार यात 'माळी समाज विवाह' चा कोणताही संबंध नसेल. तसेच स्थळाची वागणुक, नितीमत्ता, सत्यता, चारित्र्य इत्यादी व बायोडाटात लिहिलेली सर्व माहितीची खातरजमा स्वतः स्थळ निश्चित करण्या आधी करून घ्यावी. ती सर्व जबाबदारी सर्वस्वी सभासदाची अथवा पालकांची आहे.